साईजीत करिअर अकॅडमी - एक स्वप्न... एक संकल्प... एक चळवळ...!

“ज्या दिवशी आपली वाट कोणीच ओळखत नाही, त्या दिवशी वाट निर्माण करायची असते…!”
हा सिद्धांत आपल्या जीवनातून यशस्वीपणे जगून दाखवणारी… एका सामान्य घरातून आलेली, पण असामान्य स्वप्नं बघणारी… दुर्दम्य इच्छाशक्तीने भारलेली एक साधी गृहिणी – सौ. वैशाली कोते मॅडम…! जीवनात संघर्ष म्हणजे अपयश नव्हे, तर ती संधी आहे, हे त्यांनी स्वतःच्या कर्तुत्वातून सिद्ध केलं आहे. घरगुती स्वरूपात पूजेचे साहित्य विकून छोट्याशा व्यवसायाला सुरुवात करणाऱ्या या मातृशक्तीने आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर जे भव्य दिव्य उभं केलं, त्याला आज “साईजीत करिअर अकॅडमी” या नावाने संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो.
स्वप्न बघणं हे सोपं असतं, पण ते सत्यात उतरवणं हीच खरी कसोटी असते...!
गावाकडील मर्यादित संसाधने, समाजातील बंधने, आर्थिक अडचणी या साऱ्या गोष्टींवर मात करत, त्यांनी अतिशय संघर्षातून “राहाता” सारख्या ग्रामीण भागात “साईजीत करियर अकॅडमीची” पायाभरणी केली आहे. महाराष्ट्रातील अशा स्वरूपाची पहिली “महिला संचालित” भरती पूर्व पोलीस प्रशिक्षण अकॅडमी ठरण्याचा मान या संस्थेला मिळतो आहे. पुणे – मुंबईसारख्या शहरांमध्ये मिळणारे प्रशिक्षण ग्रामीण भागात पोहोचवण्याचं त्यांचं स्वप्न होतं… पण हे स्वप्न केवळ त्यांच्या डोळ्यांत नव्हतं, तर त्यांच्या प्रयत्नांत होतं. त्यांच्या कर्तृत्वात होतं. आणि म्हणूनच “राहाता” सारख्या ग्रामीण भागात एक आधुनिक, शिस्तबद्ध व दर्जेदार भरतीपूर्व पोलीस प्रशिक्षण केंद्र त्यांनी स्थापन केलं…!अत्यंत माफक शुल्कात, ग्रामीण भागातील होतकरू मुला-मुलींसाठी हे प्रशिक्षण केंद्र “नवसंजीवनी” ठरू पाहत आहे.
“साईजीत करिअर अकॅडमीच्या” शिस्तप्रिय व प्रयोगशील संचालिका सौ. वैशाली कोते मॅडम, त्यांचे तज्ञ व अनुभवी प्रशिक्षक, अद्ययावत अभ्यासिका व संगणक कक्ष, स्वयं अध्ययनासाठी सुसज्ज ग्रंथालय, मुला मुलींसाठी स्वतंत्र, सुरक्षित व स्वच्छ वसतिगृहे , पौष्टिक व घरगुती पद्धतीचे जेवण आणि शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरण यामुळे “साईजीत करिअर अकॅडमी” ही एक वेगळी ओळख निर्माण करत आहे. आज ही संस्था ग्रामीण भागातील युवक युवतींसाठी दिशा आहे, आशा आहे, आणि प्रेरणा आहे.
जिथे स्वप्न फक्त पाहिली जात नाहित, तर तिथे ती पूर्णही केली जातात...!
आज या संस्थेने अल्पावधीतच भरभरून यश मिळवले आहे. सर्व सुविधांनी युक्त असलेले हे प्रशिक्षण केंद्र अनेकांच्या आयुष्यातील प्रकाशवाटा बनलं आहे… या संस्थेचा उद्देश केवळ नोकरी देणे नाही, तर एक परिपूर्ण विद्यार्थी घडवून आपल्या भावी आयुष्यात त्याला गरुडभरारी घेण्याचं बळ निर्माण करणे हा आहे… म्हणून तर त्यांच्या या उज्वल कार्याची दखल घेत त्यांना “उद्योग रत्न पुरस्कार”, “लोकमत एक्सलन्स अवॉर्ड ” यासारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. हे अवॉर्ड केवळ सन्मान नाहीत, तर त्यांच्या अथक परिश्रमांचे, समाजासाठी देत असलेल्या योगदानाचे प्रतीक आहे… त्यांनी फक्त स्वतःचा जीवनमार्ग बदलला नाही, तर असंख्य तरुणांच्या आयुष्याला एक नवा मार्ग दाखवला आहे. वैशाली मॅडम आज केवळ एक यशस्वी उद्योजिकाच नाहीत, तर त्या हजारो तरुणांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या गुरु आहेत…
त्या म्हणतात - "जर वादळे झेपेची दिशा चुकवू पाहत असतील, तर दिशा बदलू नका, झेप अधिक तीव्र करा...!"
"आमची यशस्वी कामगिरी"



